Tuesday 15 May 2012

पान नंबर १७ वरून पुढे ......................................

" थांब महादेव, तरीही तू या घरात परत यायचे नाहीस !" दामोदरपंत त्याला थांबवत म्हणतात.
"म्हणजे अजूनही तुमचा माझ्यावरचा राग गेला नाही आहे ना?" महादेव.
" नाही पोरा, माझ्या काही अपेक्षा आहेत तुझ्याकडून आपल्या गणपतीच्या मंदिराच्या पुजेची सारी सूत्रे आता तुला सांभाळायची आहेत आणि तू जर परत या घरात आलास तर तुही बाटगा आहेस असे सारे गाववाले म्हणतील आणि तुला देवळात पूजा करून दिली जाणार नाही या दामोदर पंताने सांभाळलेला वारसा तुला पुढे न्यायाचा आहे." दामोदरपंत आपल्या डोळ्यातील पाणी पुसत बोलतात.
" बाबा तुम्हाला विसरणे अशक्य आहे तुम्हाला विसरणे म्हणजे विठ्ठलाच्या भक्तांच्या मन मानी साठी विठ्ठलाला विसरणे आणि हे कसे शक्य आहे?" महादेव
" पण हि या विठ्ठलाची इच्छा आहे असे समज"दामोदरपंत.
महादेव काही न बोलता निघून जातो. बाहेर जाताना त्याच्या मनात विचार येतो लहानपणी आपले वडील कसे होते ते आपण पहिले नाही आपली आई आपल्याला इथे सोडून निघून गेली. पण आईचे छत्र हरवले असे कधी वाटले नाही. पण आज खरोखर आई वडील हरवल्यासारखे वाटू लागले. इकडे गावात हळू हळू लोक परत येवू लागली. कोणाची जनावरे दावणीला बांधलेल्या अवस्थेतच कापली होती त्यांची सडून दुर्गंधी येत होती. गावात दर 10 पावलांवर  माणसांचा किवा जनावरांचे मृत शरीरे पाहायला मिळत होती. महादेव रस्त्याने घराकडे चालू लागतो. अचानक त्याला काही लोक नदीच्या पलीकडे जाण्यासाठी जमा झालेले आढळतात. एकाला  ते कुठे चालले आहेत हे समजण्यासाठी त्यातल्या एकाला हाक मारतो.
" काय रे यशवंत कुठे चाललात ?" महादेव
" काय सांगू नशिबाचे भोग पारवा बातावाबातावी झाली मी आणि माझी साव्भाग्यावती  तावडीत सापडली. मला बतावली आणि तिला ओढून नेली त्या राक्षसांनी.
आज बापान घर बाहेर काढली. म्हणे तू इथ राहिलास तर आम्हालाही गावातील लोक बाटगे म्हणतील . आज समाजाला टिपू सुलतानांनी नदी पलीकडे रहायची आणि खायची व्यवस्था केली आहे म्हणून चाललो आहे " यशवंत बोलत असताच त्याच्या डोळ्यातील आसवे टपकन खाली पडली.
क्रमश..........................