Friday 30 March 2012

पान नं १३ वरून पुढे...........................

              दामोदर पंत गावात येतात पण रोज गजबजलेले गाव आज सुनसान वाटत होते. जागो- जागी घरे जाळली गेली होती. गावात कुठे कुत्रेही दिसत नव्हते. दिसत होती फक्त प्रेते. माणसांची आणि जनावरांची पण कोणाही ओळखू येत नव्हते. कारण कुणाच्याही धडावर मस्तक शिल्लक नव्हते. असह्य माणसांचे शीर कापून ते नराधम कधीच निघून गेले होते. एका झोपडीतून दामोदर पंताना एका स्त्रीचे रडणे ऐकू येत होते. पण पुढे जाऊन तिची विचार पूस करायची हिम्मत होत नव्हती. दामोदरपंत तडक मंदिरात जातात मंदिर एकदम व्यवस्तीत आहे हे पाहून त्यांना थोडे बरे वाटते ते मंदिराच्या पायऱ्या चढणार इतक्यात त्यांना आपला धर्म भ्रष्ट झाले आहे त्यामुळे देव हि बाटेल हा विचार मनात येतो अगोदर आपण आपली शुद्धी करून घेवू मग मंदिरात जावू असे ठरवतात.दामोदर पंत आपल्या शेतावर असलेल्या महादेव च्या घराकडे निघतात त्यांना माहित असते महादेव आणि सुनबाई नाही आहेत पण घर व्यवस्तीत आहे ना ते पाहू या म्हणून तिकडे निघतात. महादेव चे  घर व्यवस्तीत आहे हे पाहून त्यांचा जीव भांड्यात पडतो.
           दामोदरपंत घराकडे परत फिरतात. गावातील साऱ्या लोकांचे संसार उद्वस्थ झाले होते. जे जंगलात पळाले ते वाचले पण सारे नशीबवान नव्हते अनेक हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले एवढे होऊनही थाबले नाही त्यांना पकडून बंदी बनवून टिपू च्या कुंटणखाण्यात बंदिस्त करण्यात आले यातून नाबालिक मुली सुद्धा सुटल्या नाहीत. गोठ्यात बांधलेली जनावावरांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. गावाचा तो नजरा पाहून दामोदर पंताना काय करावे तेच समाजात नव्हते. पण गावातील ती सारी परस्थिती त्यांनी घरी येवून आनंदी बाईना सांगितली. रात्री कोणीही जेवले नाही  रात्रभर आनंदीबाई गप्प बसल्या होत्या त्यांना महित होते जर आपण रडलो तर दामोदर पंतानाचा आत्मविश्वास डगमगेल रात्री त्यांचा डोळा कधी लागला ते त्यांनाच समजले नाही.
              दुसऱ्या दिवशी आपल्या गावावर आलेल्या संकटाची बातमी महादेव ला समजते तो तडक गावाकडे निघतो. आपल्या परिवाराला कोणतीही इजा होऊ नये म्हणून वाटेत येत असताना तो देवाकडे प्रार्थना करत असतो. वाटेत त्याला गावातला विठ्ठल भेटतो. घडलेली हकीगत सविस्तर सांगतो. दामोदरपंत आणि आनंदीबाई व्यवस्तीत आहेत हे ऐकून त्याला बरे वाटते पण त्यांचा धर्म भ्रष्ट झाला आहे हे ऐकून तो तिथेच मटकन खाली बसतो. थोड्या वेळाने तो परत गावाची वाट पकडतो.
क्रमश ...............

Tuesday 20 March 2012

पान नं १२ वरून पुढे...........................

        " आज पासून तुम्ही मुसलमान झालात वैद्य मिया| " अब्दुल हसत म्हणतो.
        " गोमांस खाल्ले म्हणजे मुसलमान झालो असे कोणी सांगितले अब्दुल?" दामोदरपंत.
        " मुसलमान झाला नसाल पण लवकरच होणार आहात." अब्दुल.
        " कश्यावरून मी मुसलमान होईन? मी हिंदू आहे आणि हिंदूच राहीन."दामोदरपंत.
        " अहो वैद्यजी जरी असे तुम्ही मानता.  पण मला सांगा तुमचेच हिंदू बांधव परत तुम्हाला आपल्या धर्मात घेतील का. आता तुमचा धर्म संपला तुम्ही धर्म भ्रष्ट आहात...... धर्म भ्रष्ट! आणि धर्म भ्रष्टला हिंदू धर्माची दारे  बंद असतात हे तुम्हाला चांगलेच माहित आहे वैध मिया| " अब्दुल.
         " या गलत फैमित राहू नकोस अब्दुल तुला माहित नसेल शिवाजी महाराज्यानी नेताजी पालकरांना शुद्ध करून परत धर्मात घेतले होते." दामोदरपंत.
         " शिवाजी महाराज वा चांगला दाखला दिलात पण त्याच शिवाजी महाराज्याच्या राज्याभिषेकाला तुमच्याच ब्राम्हणांनी विरोध केला होता हे विसरलात वैद्यजी " अब्दुल हसत म्हणतो.
         " साऱ्या ब्राम्हणांनी नाही कर्मठ ब्राम्हणांनी अब्दुल !" दामोदरपंत.
         " मग आता पाहू चांगले ब्राह्मण तुम्हाला परत हिंदू धर्मात घेतात का ते "अब्दुल.
         " पहात रहा अब्दुल मी तुला परत हिंदू धर्मात जाऊन दाखवतोच." दामोदर पंत
         " असे करताना तुमचा मृत शरीर नदीच्या पत्रात मिळूदे नको म्हणजे झाले . आणि असे करण्यात तुम्ही यशस्वी झालात तर मी स्वत्त हिंदू धर्म स्वीकारेन." अब्दुल.
        "बाकी परिवार किधर है इसका" एक  सैनिक विचारतो.
        " अरे बात करते वक्त ये तो याद हि नाही राहा. सारा घर कि तलाशी लो| " अब्दुल हुकुम देतो बाकीचे शिपाई घर शोधू लागतात आतल्या खोलीत आनंदीबाई भेटतात दोन  सैनिक तिला पकडून माजघरात घेवून येतात. तिला पाहून दामोदरपंतांच्या कपाळाला आट्या पडतात ते मनातच म्हणतात संपले सारे आता. शिपाई तिलाही गोमांस भरवतात. थोडा वेळ शोधा शोध करून सारे नराधम निघून जातात. दामोदरपंत तिथेच कोपऱ्यात बसतात.
         " तुम्हाला मागच्या दाराने जायला सांगितले होते ना?" दामोदरपंत.
         " तुम्हाला अश्या अवस्थेत सोडून कशी जाऊ शकते?" आनंदीबाई .
        " चला , घर सफ करा गावात कोणालाही काही समजून देवू नका. काही झालेले नाही आहे. मी थोडे बाहेर पाहून येतो. गावात नक्की काय परस्थिती आहे ते पाहून येतो." दामोदर पंत असे म्हणून बाहेर पडतात. तोंडात गोमासाची तुरट चव अजूनही जात नसते. मनात आत्महत्येचा विचार येतो पण मुलांच्या विचाराने ते लांबवतात. आपण बाटलो असलो म्हणून काय झाले मुले तर  धर्मात आहेत. आता ती आपल्या पायावर उभी आहेत आपल्याला  आता मुलांसाठी नाही आपल्या सहचारणी आपल्या बायकोसाठी जगायचे आहे कारण आपल्याशिवाय ती अजिबात जगणार नाही
क्रमश .........................
        
 

Friday 16 March 2012

पान नं ११ वरून पुढे...........................

                                                           आभाळ कोसळते.
          ( वाचकांना विनंती आहे कि या कादंबरीचा उद्देश कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा अजिबात उद्देश नाही हे परत सांगतो आहे त्या काळी कोणत्या परस्तीतीत ओढवली होती आणि आपल्या हिंदू लोकांनी कोणती चूक केली ज्याची फळे आज हि आपण भोगत आहोत हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे. अश्या चुका आपल्या हातून परत होऊ नयेत हाच या कादंबरीचा मुळ उद्देश आहे )
सकाळी सकाळी दामोदरपंत मंदिरातील गणपतीच्या पूजेसाठी तयारी करत असतात. अनुराधा सात महिन्याची गरोदर असते. तिला बाळंतपणाला तिचे आई वडील घेवून जातात. सोबत १-२ दिवस महादेव ने हि यावे असे तिच्या वडिलांना वाटत असते. ते त्याला आपले मनोगत सांगतात मग महादेव हि त्यांचे मन नाही मोडत. अंगणात लक्ष्मी सडा काढत असते अचानक ती समोर काहीतरी पाहते आणि धावत घराच्या आतमध्ये जाते दरवाज्याचे अडसर लावते आणि जोरात दामोदार्पन्ताना हाक मारते.  काय झाले हे पाहायला दामोदर पंत आणि आनंदीबाई माजघरात येतात.
      " काय झाले पोरी ?" दामोदरपंत.
      " बाबा, बाहेर सुलतानाचे शिपाई आलेत त्यांच्या हातात गाईचे कापलेले मुंडके आहे." लक्ष्मी घाबरून सांगते.
     " काय?" आनंदीबाई.
     " हो आई, आणि हातात तलवारी आहेत ते मला पाहून आपल्या घराकडे धावले. आई- बाबा काहीतरी अपशकून होणार आहे." लक्ष्मी.
     " आनंदी तुम्ही सुनबाई ला घेवून निघा मागच्या दरवाज्याने मी पाहतो." दामोदर.
     " अहो, तुम्हीही चला ना ." आनंदीबाई.
     " माझे ऐका सून बाईला घेवून निघा नाहीतर सुनबाई चे काही बरे वाईट झाले तर अम्बजीला काय जवाब देणार आहात " दामोदरपंत.
    " बाबा तुम्हीहि चला ना !" लक्ष्मी.
    " पोरी तुम्ही दोघी निघा. जर आपण तिघेही पळालो तर पकडले जाऊ तुम्ही पळा मी त्यांना इथे काही काळ थांबवून ठेवतो." दामोदरपंत तिला समजावतात.आणि दरवाज्यावर टक टक होते बहिरून आवाज येतो
     " हम सुलतान के शिपाई है दरवाजा खोलो नाही तो तोड देंगे , और अंदर किसीको जिंदा नाही छोडेंगे "
     " पळा लवकर मी तुमच्या दोघींच्या पाया पडतो." दामोदरपंत विनवणी करतात. आता यांना समजावून काही उपयोग नाही हे समजून आनंदीबाई लक्ष्मी ला घेवून मागच्या दाराने पळतात. येवढा वेळ कोणी दरवाजा खोलत नाही म्हणून बाहेर असणारे शिपाई कमकुवत दरवाजा एका फटक्यात तोडतात. बाहेरून २०-२५ सैनिक नंग्या तलवारी घेवून आत घुसतात. काही सैनिकांच्या हातात चामड्याच्या पिशव्या असतात एक -दोन सैनिकांकडे गाईची ताजी कापलेली मुंडकी असतात.
         आत येणारा त्यांचा म्होरक्या दामोदार्पन्ताना पाहून साऱ्यांना थांबवतो.
           " अरे ये तो वैद्यजी है ,"
          " काय झाले आणि तुम्ही लोक हे सारे .........." दामोदरपंत त्यांच्याकडे भेदरून विचारतात.
         " काही नाही वैद्याजी आज खूप आनंदाचा दिवस आहे काल आमचे युवराज टिपू गादिवर बसले आणि त्यांनी घोषणा केली कि सारे हैद्राबाद संस्थान को मुसलमान करेंगे. हमारे राज्य के हित के लिये आपको मुसलमान बनना पडेगा वैध्यजी" त्यांचा म्होरक्या सांगतो इतक्यात एक सानिक ओरडतो. " इसे मार डालो सर् कलम करो इसका ."
        " खामोश .अगर ये मुसलमान बनने के लिये राजी है तो हम छोड देंगे|" म्होरक्या ओरडतो.
        " पर ये बुढ्ढा हमारे किस काम का ये हमारे इस्लाम बढानेके कोई काम नाही आयेगा इसकी उमर हो चुकी है आप को मालूम है ना सुलतान ने हमे एक सर् कलम करनेके बदलेमे ५ रुपयेका इनाम राखा है|" दुसरा शिपाई म्हणतो.
       " ये हमारे काम आयेंगे, ये बहुत बडे वैद्य है , और अच्चे वैद्य कि इस्लाम को जरुरत है मिया " म्होरक्या म्हणतो.
       " पण मी मुसलमान नाही बनणार ." दामोदरपंत रागाने म्हणतात आणि साऱ्या सैनिकांमधून अल्ला हो अकबरच्या घोषणा दम-दुमतात सारे शिपाई मारायला धावतात पण म्होरक्या त्यांना थांबवतो.
       " हे पहा वैद्य जी एके काही वर्ष्यापुर्वी तुम्ही माझे जीव वाचवले होतेत त्यामुळे अजून पर्यंत मी थांबलो आहे. नाहीतर अजूनपर्यंत तुमचे मुंडके धडावेगळे केले असते. इस्लाम कहता है कोई अगर तुम्हारी जान बचाये तो एक बार उसको माफ करके उसकी जान बक्ष दो  इसलिये मै आपको मारना नाही चाहता|" म्होरक्या.
      " अब्दुल एक वेळ जेव्हा मी कुणावर उपचार करतो ते अजिबात विसरत नाही आणि कुणी उपकार केले तर तेही अजिबात विसरत नाही. पण तुला मी केलेले उपकार दिसले पण त्या मुक्या जनावरांनी केलेले उपकार नाही दिसले ज्या गाईंचे तुम्ही मुंडके छाटले आहे त्या गाईच्या कुलाने कधीतरी तुला दुध पाजले असेल त्या गाईच्या कुळातील गाईने पाडसाला जन्मह दिला असेल जे पाडस मोठे होवून नांगर ओढून तुला दोन वेळेचे जेवण देते त्या गाईचे उपकार विसरून तिची तुम्ही कत्तल करता इस्लाम च्या नावावर तुमच्या देवा विषयी मला जास्त माहिती नाही पण  तो हि साक्षात खाली आला तरी तुमचे हे कृत्य पाहून लाजेने मान खाली घालेल." दामोदरपंत आपल्या डोळ्यातील आसू पुसत बोलतात.
      " और एक लब्ज बी जादा निकाला तो जबान काट के कुत्तेको खिला दुंगा|" अब्दुल रागाने बोलतो. साऱ्या घरात शांतता पसरते " देख क्या रहे हो इसको गो मांस खिला दो." अब्दुल हुकुम देतो.
      "या पेक्षा मला मारून टाका ." दामोदरपंतअसे म्हणतात पण त्या अगोदर २-३ सैनिक त्यांना पकडतात एक सैनिक कातडी पिसावितील गोमांस काढून दामोदर पंतांच्या तोंडात घालतो. उग्रस तुरट चव जिभेला लागते दामोदरपंत उलटी  करतात.
क्रमश...........................
       

Saturday 10 March 2012

पान नं १० वरून पुढे...........................

          " आई आज याने माझ्या कानाखाली मारली. या अश्रीताची आता इथपर्यंत मजल गेली आहे."अंबाजी.
          " अंबाजी तोंड सांभाळून बोल." आनंदीबाई रागाने म्हणतात.
          " हो बरोबर आहे आता हा आश्रीत नाही आहे मी आश्रीत आहे या घरात. ठीक आहे आज संध्याकाळ पर्यंत हा राहील या घरात किवा मी जर तुला वाटत असेल मी या घरात राहावे तर आज संध्याकाल्पर्यात  हा या घरातून निघून गेला पाहिजे नाहीतर या घरात मी परत कधीच पाऊल ठेवणार नाही सांगून ठेवतो." असे म्हणून अंबाजी बाहेर निघून जातो.
          " काय करावे अश्या अवगुणी पोराचे तेच समजात नाही. " असे म्हणून आनंदीबाई सुद्धा आतमध्ये जातात.
          " चला अनुराधा बाई आपल्याला आता निघायची तयारी करायची आहे." महादेव.
          " कुठे?" अनुराधा आश्चर्याने विचारते.
          " या घरात आज आपला शेवटचा दिवस . माझ्यामुळे अम्बजीला वाटते कि त्याचे हक्क मला मिळतात आणि त्याचे वाईट व्यसनांकडे वळण्याचे कारणही तेच आहे. जर आपण इथे राहिलो तर तो अजून वाईट व्यसनांच्या आहारी जाईल . .... चला तयारी करा. " महादेव.
         " पण कुठे जायचे? " अनुराधा.
         " बाजूच्या गावात माझे घर आहे पडक्या अवस्थेत आज तेथे जावून साधी झोपडी बांधू आणि नंतर सावकाश पक्के घर बांधू ." महादेव.
               दुपारची वेळ असते दामोदरपंत देवळातून जेवायला घरी येतात. दुपारी सारे जेवायला बसतात. महादेव आपण घर सोडून जात आहोत याची त्यांना कल्पना देतो.
         " मला न विचारता निर्णय घेतलास पण माझ्या स्वप्नांचे काय?" दामोदरपंत जेवता जेवता विचारतात.
         " बाबा तुमचे कोणतेही स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी वाट्टेल त्या प्रकारची  किंमत द्यायला तयार  आहे "
         " माझ्याने आता मंदिरातल्या पूजेची धावपळ तसेच जंगलात जावून वन औषधी आणणे झेपत नाही ती कामे तू माझ्या मागे करावीस असे मला वाटते कारण अंबाजी कडून त्या गोष्टीची अपेक्षा मी करतच नाही." दामोदरपंत.
         " पण बाबा , मी घरातून जात आहे तुमच्यापासून नाही दूर जात आहे." महादेव
         " तू बाजूच्या गावात जाणार ४ मैलाच्या अंतरावर तेथून येणार कधी परत जाणार कधी ? त्यापेक्षा आपल्या शेतावरच्या घरात का नाही राहत?" दामोदरपंत.
महादेवाला हि त्यांचे विचार  पटतात  तो शेतावरच्या घरात राहायला राजी होतो. संध्याकाळी तो आणि अनुराधा शेतावरच्या घरात निघून जातात. बघता बघता वर्ष निघून जाते दामोदरपंत अम्बजीचे हि लग्न करून देतात. अंबाजी हि काही प्रमाणात सुधारतो. गावात कमवायची व्यवस्था नसल्याने तो पुण्याला निघून जातो. महादेव रोज सकाळी उठून गणपतीच्या मंदिरात पूजा करणे आणि पूजा आटोपली कि वन औषधी आणण्यासाठी जंगलात जात असे कोणत्या आदिवशी पाड्यावर जर त्याला मुक्काम करायचा असेल तर तो अनुराधाला अगोदरच सांगून ठेवत असे मग अनुराधा दामोदार्पन्तांकडे राहायला जात असे.
            जरी महादेव आणि अम्बजीचे जमत नसले तरी अंबाजीची बायको लक्ष्मी आणि अनुराधेच खूप चांगले जमत असेकधी कधी त्यांच्यामधले नाते पाहून आनंदीबाईना वाटत असे खरेच असे जर अंबाजी आणि महादेव राहिले असते तर किती बरे झाले असते. सारे काही सुरळीत चालले होते. पण हि वादळापूर्वीची शांतता होती यानंतर दामोदरपंतच्या कुटुंबात जे वादळ घोंघावणार होते त्याची कल्पना विधात्यानेही केली नसेल.
क्रमश ...............................

      
     

पान नं ९ वरून पुढे...........................

        "अहो रोज तुम्हाला घाबरणारा हा पोर आज तुम्हाला सवाल जवाब करतो आणि तुम्ही नुसते पहात राहता" आनंदीबाई बादाल्यावर हताश बसलेल्या दामोदरपंताना म्हणतात.
       " अहो आपल्या पायातील कोल्हापुरी चप्पल मुलाच्या पायात होऊ लागल्यावर त्याला धाक देवू नये तर समजावून सांगावे असे आमचे आजोबा सांगायचे.माझ्या वडिलांना" दामोदरपंत
       " तुम्हाला नाही वाटत अंबाजी हाताबाहेर जावू लागला आहे. समजावून सांगण्याच्या पलीकडे " आनंदीबाई
       " यावर उपाय आहे " दामोदरपंत.
       " मला नाही वाटत त्याच्यावर कोणताही उपाय लागू होईल." आनंदीबाई.
       "वेळीच त्याच्या गळ्यात लोडणे घालणे हाच त्याच्यावर उपाय आहे." दामोदरपंत
       "म्हणजे त्याचे लग्न करावे असे म्हणायचे  आहे का तुम्हाला?" आनंदीबाई
       " हो, पण त्याअगोदर महादेव चे लग्न करणे आवश्यक आहे. आता आपण किती दिवस जगणार आपल्या मागे या दोघांचे जमणे कठीण आहे . म्हणून यावर एकच उपाय महादेवला या घरापासून वेगळे करणे." दामोदरपंत.
        " हे पहा, महादेव माझा मुलगा नसला तरी मी पोटाच्या पोराप्रमाणे वाढवली आहे तो माझ्या नजरेचा दूर कसे करू शकता तुम्ही" आनंदीबाई कळ कळीने  म्हणतात.
        " आनंदीबाई आता त्याला इलाज नाही आहे काळजावर दगड ठेवायला शिका. मी नदी पलीकडच्या पेंडसेची  मुलगी अनुराधा महादेव साठी पहिली आहे. मुलगी गुणाची आहेच आणि नाकी डोली हि व्यवस्तीत आहे " दामोदरपंत.
        " पण महादेवला विचारलेत का?"
        " तुम्हाला  काय वाटते तो माझ्या शब्दाबाहेर जाईल?.दामोदरपंत
        " तसे नाही, पण त्याच्या आयुष्यात येणारी व्यक्ती त्याच्या मनासारखी असावी असे मला वाटते."
        " हो ते तर आहेच पण त्याला नाही आवडणार असे मला नाही वाटत."दामोदरपंत
              संध्याकाळ होते. महादेव घरी येतो हात-पाय धुवून देवाला दिवाबत्ती करू लागतो. आनंदीबाई त्याच्या लग्नाची बातमी त्याला देतात. महादेव कोणतेही आढे- वेढे न घेता होकार देतो. मुलगी पाहण्याचा कार्य क्रम होतो.दोघांच्या पत्रिका जुळतात. लग्नाची तारीख ठरते. सारे काही सुरळीत होते. काही महिने निघून जातात. लग्न पार पडते. नवीन सुनबाई घरी येते. दामोदर पंत महादेव साठी शेतावर एक छोटेसे घर बांधतात. पण त्यांना पक्की खात्री असते दामोदर आपल्याला सहजा-सहजी सोडून जाणार नाही. कोणत्या कारणाने त्याला आपल्यापासून दूर करावे याचा ते रोज विचार करत असतात. पण एक दिवस तो दिवस येतो अंबाजी आता कोणाचेच ऐकत नसे. त्यात त्याला जुगाराचे नाद लागलेला असतो. एक दिवस तो घरातील देवार्यातील चांदीचा गणपती जुगारात लावतो. सकाळी महादेव आंघोळ करून देवाची पूजा करायला जातो तेव्हा त्याला देवार्यात गणपती नसतो हे समजते. तो अम्बजीने लांबवला असेल याची त्याला खात्री असते. तो तडक उठतो आणि साखरझोपेत असणाऱ्या अम्बजीला जागवतो.
          " अंब्या उठ." महादेव
          " काय आहे, सारे माझ्या जीवनातील हिरावून घेतलेस आता झोप हि हिरावून घ्यायची इच्छा आहे काय " अंबाजी  डोळे चोळत बोलतो.
          " देव्ह्र्यातील गणपती कुठे आहे? " महादेव.
           " मला काय माहित?"
           " हे बघ अंब्या मला सांग तो कोणत्या सोनाराकडे विकलास मी सोडवून आणेन. आणि बाबांना कळूही देणार नाही ." महादेव .
            " हे पहा मला माहित नाही पहिलेच सांगतो आहे " अंबाजी
            " हे पहा अंब्या आज पर्यंत मी तुझे सारे गुन्हे माफ करत आलो पण जर तुझ्या घाणेरड्या जुगाराच्या नादापायी आजोबांनी बाबांना दिलेला गणपती  तू विकला असशील तर मी तुला माफ नाही करणार पहिलेच सांगून ठेवतो आहे." महादेव.
            "ये शहाण्या मला माफ करणारा कोण रे तू? तुझा माझ्याशी संबंध काय इतके वर्ष आमचा आश्रित राहून, माझे हक्क चोरून मला चोर म्हणतोस." अंबाजी रागाने म्हणतो.
             "अंब्या तोंड सांभाळून बोल. मी तुझा मोठा भाऊ आहे.
            " हे बघ खोटी नाती लावू नकोस. आणि गणपती मीच घेतला आणि तो विकला नाही सरळ जुगारात लावला . कारण मला पाहायचे होते ज्या देवाला तुम्ही दिवस-रात्र पुजता तो देव पणाला लावल्या नंतर स्वत्ताला तरी वाचवू शकतो का. पण नाही तो देव सुद्धा स्वत्ताला नाही वाचवू शकला तो देव मला काय वाचवणार?" अंबाजी.
           " तू गणपती जुगारात लावलास?" महादेव रागाने म्हणतो.
           " हो , आणि हरलोही. बाबांना सांगणार आहेस ? ....जा सांग मला काही फरक नाही पडत." अंबाजी बेफिक्रीने म्हणतो आणि महादेव त्याच्या कानाखाली मारतो. मग अंबाजी त्याच्या सदर्याची बाही पकडतो मग महादेव हि त्याची बाही पकडतो त्यांचा चाललेले भांडणाच्या आवाजाने आनंदीबाई धावत येतात दोघांना बाजूला करतात. अनुराधा हि येते. ती महादेवला बाजूला करते.
क्रमश ...............
         

Friday 9 March 2012

पान नं ८ वरून पुढे...........................

       काही वर्ष महादेव आईला नकळत विसरला होता. आता तो आनंदीबाईनाच आपली आई मानत असे. पण आज अचानक दामोदार्पन्तानी त्याच्या हातात जानकीचे पत्र देवून जुन्या आठवणी उकरून काढल्या होत्या. आईचे नाव परत नाही काढणार म्हणणारा महादेव हळूच जानकीचा पत्र उघडतो काही मिनिटे वाचतो डोळ्यात हळूच धारा लागतात. पुन्हा ते पत्र व्यवस्तीत गुंडाळून ठेवतो. आणि बाहेर निघून जातो. दरवाज्याच्या आडून दामोदर पंत त्याच्या प्रत्तेक हालचालीकडे लक्ष ठेवून असतात. तो बाहेर निघून का गेला हे त्यांना माहित असते इतक्यात आनंदीबाई आतून महादेवला हाक मारतात दामोदरपंत तिला तो घरी नाही आहे हे सांगतात.
      " कुठे गेला आता तर होता इथे?" आनंदीबाई माजघरात येत विचारतात.
      " नदीवर " दामोदरपंत.
      " आता या वेळी कशाला गेला नदीवर ? "
      " तुला माहित आहे ना कधी त्याच्या मनाच्या विरोधात काही झाले कि तो नदीवर जातो." दामोदरपंत तिला समजावत म्हणतात.
       " तुम्ही काही बोललात का त्याला ?" आनंदीबाई काळजीने बोलतात.
       " नाही हो, त्याच्या आईने दिलेले पत्र त्याच्या हातात दिले." दामोदरपंत
       " मग त्या पत्रात काही त्याच्या मानाविरोधात लिहिले होते का? "
       " आता ते मला कसे माहित असणार?, मी कुठे ते वाचले होते त्याच्या आईची इच्छा होती ते पत्र फक्त महादेव नेच वाचावे. पण नक्की काहीतरी त्याच्या मनाच्या विरोधात असेल किवा तिची आठवण आली असेल त्याला आणि कितीही झाले तरी आपण त्याचे खरे आई-बाबा नाही आहोत." दामोदरपंत.
     " पण आपण त्याला आपल्या पोटाच्या पोरासारखे वाढवले आहे ना ,अम्बाजीपेक्षा जास्त प्रेम केले आपण त्याच्यावर आपल्या पोटाचा पोर नसला म्हणून काय झाले पोटाच्या पोरापेक्षा जास्त प्रेम केले आपण त्याच्यावर मग आपले त्याच्यावर काहीच हक्क नाही ?" आनंदीबाई असे म्हणतात आणि बाहेर खूप वेळ त्या दोघांचे बोलणे ऐकणारा अंबाजी अचानक आतमध्ये येतो.
     " लोक खूप सांगायची हा महादेव तुझा खरा भाऊ नाही आहे , पण मला ते तुमच्या तोंडातून ऐकायचे होते , वा बाबा तो तुमचा खरा मुलगा नसूनही प्रत्तेक गोष्ट पहिली त्याला मिळत असे , प्रत्तेक वेळी त्याचे ऐकून मला तुम्ही शिक्षा करत असत.........." बाहेरून माजघरात येत अंबाजी म्हणतो.
      " पोरा, आम्ही  तुला कधीच अंतर नाही, आणि तो एक अनाथ होता........." आनंदीबाई त्याची समजूत काढत बोलतात
      " जगात महादेव एकटाच अनाथ आहे का? कित्तेक मुल अनाथ असतात साऱ्यांना तुम्ही माझे भाऊ म्हणून आणाल का ?" अंबाजी
      " प्रत्तेक गरीबावर दया करणे हे आपले धर्म आहे पोरा." कधी नव्हे ते दामोदरपंत आज अम्बजीला समजावण्याचा प्रयत्न करतात पण अंबाजी कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो. रोज दामोदार्पन्ताना घाबरणारा अंबाजी आज त्यांच्या समोर उभा राहून त्यांना सवाल जवाब करत होता काय होत आहे हे आनंदीबाई नाही कळत नव्हते.
     " वा बाबा तुम्हाला आतःवते आहे लहानपणी मी एका जखमी मांजराला घरी आणले होते तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात ' जगात प्रत्तेक दुर्बल घटकाचा अंत होणे हा सृष्टीचा नियम आहे. आणि या मांजराच्या पिल्लू हा जखमी आहे म्हणून त्याचा अंत जवळ आहे तू सृष्ठीच्या नियमात ढवळा ढवळ करू नको हे जेथे मिळाले आहे तेथे सोडून ये. हीच गोष्ट महादेवला का लागू झाली नाही बाबा.? "
       " त्या मांजराच्या पोटात खोल जखम झाली होती ते जगणे शक्य नव्हते अंबाजी म्हणून मी म्हणालो." दामोदरपंत त्याला समजावत सांगतात.
       " बाबा , आई तुम्ही त्याला आपला मुलगा मानत असाल पण मी त्याला माझा भाऊ  कधीच मानला नाही आणि मानणार हि नाही .हि काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि हो वेळ पडल्यास मी त्याचा बदला जरूर घेईन."
  अंबाजी असे म्हणतो आणि आनंदीबाई त्याच्या खड्कन कानाखाली मारतात. दामोदरपंत तिथेच सुम्भाने विणलेल्या बादल्यावर बसतात अंबाजी रागाने बाहेर निघून जातो.
क्रमश..............

Thursday 1 March 2012

पान नं ७ वरून पुढे...........................

            महादेव दामोदर पंतांच्या हातातील पत्र घेतो. त्याला वाचायला अडचण होऊ नये म्हणून दामोदरपंत माजघरात निघून जातात. महादेवला आईची आठवण कधी आली नाही असे नाही. खूप वेळा त्याने आपल्या आईला शोधण्याचा प्रयत्न केला. आई लहानपणी म्हणाली होती " महादेव तुला माझी आठवण आली कि नदीवर ये मी तुला नदीवर नक्की भेटेन." महादेव खूप वेळा नदीवर जायचा खूप वेळा त्याने जानकीला शोधण्याचे प्रयत्न केले पण त्याला कधीच जानकी भेटली नाही. आईच्या आठवणीने तो रात्री एकटाच कुशीत रडत बसायचा. एक दिवस बाजूला झोपलेल्या आनंदीबाईना महादेवच्या हुंदक्यांचा आवाज आला त्यांना उमगले महादेव ला आईची आठवण येत आहे
           " पोरा महादेवा , आईची आठवण येत आहे होय." आनंदीबाई त्याच्या डोक्यावर हात फिरवत बोलतात.
            " नाही मोठ्या आई ." महादेव आपले डोळे पुसत बोलतो.
           " म्हणजे तू मला आई नाही मानत ना? " आनंदीबाई
           " असा कधी म्हणालो मी ?" महादेव.
           " मग माझ्या प्रेमात काय कमी पडले पोरा जे तुला आपल्या आईची आठवण आली." आनंदीबाई असे म्हणताच महादेव आपली कुस बदलून आनंदीबाईना मिठी मारतो.
          " नाही मोठ्या आई मला तुम्ही माझ्या खऱ्या आईपेक्षा श्रेष्ठ आहात. मला जर कुणी तुम्ही आणि माझी आई यातील एकाची निवड करायला सांगितली तर मी तुमची निवड करेन." महादेव.
           " मग मला मोठ्या आई न म्हणता फक्त 'आई' म्हण पाहू " आनंदीबाई.
           " आई ." असे म्हणून आनंदी बाई ना बिलगतो.
         ती रात्र निघून जाते महादेव सकाळी उठतो देवाची पूजा करतो. आज तो मनाशी ठरवतो आज आईला काही झाले तरी शोधून काढायचे. त्यासाठी काही करायला लागले तरी चालेल पण आज ती नाही भेटली तर तिला कायमचे विसरायचे. तो नदीकाठावर जातो सारा नदीकाठ पिंजून काढतो पण त्याला तो मिळत नाही. तो आपल्या स्वत्ताच्या गावात जातो. घरी पाहतो तर जिथे त्याचे घर होते ते पडले होते मध्ये असणारा लाकडाचा खं मात्र उभा होता. त्यावर एक मधमाशीचे पोळे होते.आपल्या घराची अशी अवस्था का झाली असावी हे त्याला उमगत नाही. तो घाबरत- घाबरत थोडे दूर असणाऱ्या जोश्याना आई बद्दल काहीतरी माहित असेल म्हणून तेथे जातो. त्याला पाहून अंगणात खेळत असणारा जोश्यांचा मुलगा गजानन धावत त्याच्या जवळ येतो.
          "महादेव  कुठे गेला होतास ? किती दिवस मी तुझी खेळायला वाट पाहतो आहे." गजानन
          " तू माझ्या आईला पाहिलीस कुठे?" महादेव.
          " नाही, तू गेल्यानंतर काही दिवस ती होती पण मग कुठे गेली ती माहीतच नाही." गजानन.
एवढ्यात जोशी काकू बाहेर येतात. महादेव ला पाहून त्यांची तळ- पायातील आग मस्तकात जाते.
        " गजानन तुला किती वेळा सांगितले त्या पांढऱ्या पायाच्या मुलाबरोबर खेळू नको म्हणून."
         " काकू मी खेळायला नाही आईला शोधायला आलो आहे. तुम्हाला माहित आहे का माझी आई कुठे आहे."महादेव विनवणी करत बोलतो.
         " बापाला खाल्लीस तर खाल्लीस आता आईला पण खाल्लीस वाटते." जोशी काकू काय बोलल्या त्या महादेवला समजले पण त्यांच्याकडून आपल्याला समाधानकारक उत्तर मिळणार नाही हे त्याला माहित होते म्हणून अजून पण उतारा होण्याअगोदर आपण इथून निघून गेलेले बरे म्हणून तो तेथून निघून जातो. हताश होऊन घराकडे निघतो.रस्त्यात त्याला दामोदरपंत भेटतात.
        " बाबा, तुम्ही इकडे? " महादेव आश्चर्याने विचारतो
        " काय करू पोरा तुझ्या आईने तू रात्रीची सारी हकीगत सांगितली. आज दुपारी तू जेवायला नाही आलास आम्हाला दोघांना खूप काळजी वाटत होती म्हणून मी सारा गाव पालथा घातला तेथे तू नाही भेटलास म्हणून वाटले तू नक्की तुझ्या घरी गेला असशील म्हणून इकडे आलो."
       " बाबा कुठे गेली असेल आई? " महादेव
       " जिथे पण असेल तेथून तिला तुझी आठवण नक्की येत असेल." दामोदरपंत
       " मग ती मला भेटायला का नाही येत. तिला माहित नाही का मी तिची किती आठवण काढत असेन?" महादेव रडत बोलतो.
       " जगातील साऱ्या आईंना आपल्या मुलांची आठवण येते पोरा." दामोदरपंत त्याची समजूत काढत बोलतात.
       " मग ती मला का नाही भेटायला येत.बाबा ?"
       " तिची काहीतरी मजबुरी असेल." दामोदरपंत.
       " मग आज पासून मीही ठरवतो यापुढे मी तिला कधीच शोधणार नाही आणि कधीच तिची आठवण हि काढणार नाही ......कधीच नाही " महादेव दामोदर पंताना बिलगतो. दामोदर पंत त्याचे डोळे पुसतात. महादेव न बोलता त्यांच्या मागे मागे घराची वाट चालू लागतो
क्रमश.............