Sunday 22 April 2012

पान नंबर १५ वरून पुढे ................

"पण महादेव असा काही करेल यावर माझा अजिबात विस्वास बसत नाही ." आनंदीबाई.
" या हाताने अग्नी द्यायचे  सोडून मुठ माती देवून आलो आहे आनंदीबाई, आणि याला फक्त आणि फक्त जबाबदार महादेव आहे." दामोदरपंत हताश होऊन खाटेवर बसतात आनंदीबाई त्यांचे सात्वन करू लागतात इतक्यात दारावर टक- टक होते. आनंदीबाई डोळ्यातील अश्रू पुसून कोण आहे म्हणून विचारतात
" आई मी महादेव दरवाजा खोल आई "
आनंदीबाई दरवाजा खोलायला निघतात इतक्यात दामोदरपंत त्यांना थांबवतात.
"आता कशाला आला आहे अजून काय शिल्लक राहिले आहे का?" दामोदरपंत.
" बाबा ,अगोदर दरवाजा उघडा मी सांगतो सगळे." महादेव बाहेरून विनवू लागतो.
" तू काय सांगणार आहेस हे मला पक्के ठावूक आहे आता तू इथे आम्हाला आमच्या हालावर ठेवून निघून गेलास तर खूप उपकार होतील." दामोदरपंत
" अहो पण तो काय म्हणतो आहे ते एकून तर घेवू या " आनंदीबाई विनवणी करतात.
" आम्हाला नदीवर खूप ऐकवला आता तुम्हाला ऐकायची इच्छा असेल तर जरूर ऐका."
" बाबा, कृपा करून दरवाजा उघडा मला तुमच्याशी बोलायचे आहे." महादेव विनंती करू लागतो.
" अहो उघडा  ना कदाचित त्याला महात्व्हाचे बोलायचे असेल."आनंदीबाई .
" उघडा दरवाजा पण शेवटचा या पुढे त्याला या हाराचे दरवाजा बंद असेल ." दामोदरपंत परवानगी तर देतात पण दरवाजाकडे पाठ फिरवतात आनंदी बाई दरवाजा उघडतात महादेव केळीच्या पानात जेवणाची झाकलेली दोन ताटे घेवून आत येतो. ताटे khali कोपर्यात ठेवून पाठमोऱ्या दामोदार्पन्तांचे आणि आनंदी बाईंचे पाया पडतो.

" बाबा , मला माहित आहे आज तुम्ही माझ्यावर रागावला असाल आणि आज झालेल्या प्रकाराबद्दल तुम्ही मला कधीच माफ करणार नाही. पण प्रत्तेक आरोपीला आपली बाजू मांडण्याचा दरबारात अधिकार असतो मीही माझी बाजू मांडतो कदाचित तुम्ही मला माफ करालाही. काल  झालेला प्रकार मला समाजाला तसा मी लगेचच परत निघालो रस्त्यात आपल्या घराची परस्थिती समजली मला माहित होते काळाच्या दिवशी तुम्ही दोघांनी काही खाल्ले नसेल म्हणून पहिला शेतावरच्या घरात जाऊन मऊ भात बनवला पण इतक्यात लोक नदीच्या दिशेने धाव पळ करत असल्याचे समजले रस्त्यातून जाणाऱ्या मोरोपंतांची भेट घडली त्यांनी सांगितले तुम्ही म्हणे नदीवर अधर्म करायला जात आहात तुम्हाला रोखण्यासाठी ते भट वाडीतील काही ब्राम्हणांना घेवून तुम्हाला दगडाने मारण्यासाठी जात आहे असे सांगितले जर मी तुम्हला रोखले नसते तर सार्या ब्राम्हणांनी तुम्हाला दगडाने ठेचून मारले आसते आणि हे drushya मी कसे पाहू शकलो असतो बाबा ? वाहिनी तर या जगातून निघून गेली होती पण तुम्ही मला हवे होतात लहानपणी सक्ख्या बापाला गमावली होती आता परत त्याचे दुक्ख नाही आहे पण ज्याने पाळले पोसले ज्याची जागा माझ्या ह्रिदयात देवाची आहे त्याचे मृत्यू हे डोळे कसे काय पाहू शकतात बाबा ?"

"मी तुम्हाला म्हटले होते ना आपला महादेव असे करूच शकत नाही " आनंदीबाई महादेवच्या तोंडावर हात फिरवत म्हणतात.

" निघतो बाबा संध्याकाळी परत येईन सोबत जेवण घेवून आलो आहे कृपया जेवून घ्यावे आणि परस्थितीला तिच्या हालावर सोडा कारण प्रत्येक दुख नंतर सुख ह येतातच म्हणून माणसाने सुखाची अपेक्षा न करता दुक्खाचा सामना करावा असे तुम्हीच मला सांगितले होते ना?" असे म्हणून महादेव जाऊ लागतो
क्रमश .......................................

No comments:

Post a Comment