Friday 9 March 2012

पान नं ८ वरून पुढे...........................

       काही वर्ष महादेव आईला नकळत विसरला होता. आता तो आनंदीबाईनाच आपली आई मानत असे. पण आज अचानक दामोदार्पन्तानी त्याच्या हातात जानकीचे पत्र देवून जुन्या आठवणी उकरून काढल्या होत्या. आईचे नाव परत नाही काढणार म्हणणारा महादेव हळूच जानकीचा पत्र उघडतो काही मिनिटे वाचतो डोळ्यात हळूच धारा लागतात. पुन्हा ते पत्र व्यवस्तीत गुंडाळून ठेवतो. आणि बाहेर निघून जातो. दरवाज्याच्या आडून दामोदर पंत त्याच्या प्रत्तेक हालचालीकडे लक्ष ठेवून असतात. तो बाहेर निघून का गेला हे त्यांना माहित असते इतक्यात आनंदीबाई आतून महादेवला हाक मारतात दामोदरपंत तिला तो घरी नाही आहे हे सांगतात.
      " कुठे गेला आता तर होता इथे?" आनंदीबाई माजघरात येत विचारतात.
      " नदीवर " दामोदरपंत.
      " आता या वेळी कशाला गेला नदीवर ? "
      " तुला माहित आहे ना कधी त्याच्या मनाच्या विरोधात काही झाले कि तो नदीवर जातो." दामोदरपंत तिला समजावत म्हणतात.
       " तुम्ही काही बोललात का त्याला ?" आनंदीबाई काळजीने बोलतात.
       " नाही हो, त्याच्या आईने दिलेले पत्र त्याच्या हातात दिले." दामोदरपंत
       " मग त्या पत्रात काही त्याच्या मानाविरोधात लिहिले होते का? "
       " आता ते मला कसे माहित असणार?, मी कुठे ते वाचले होते त्याच्या आईची इच्छा होती ते पत्र फक्त महादेव नेच वाचावे. पण नक्की काहीतरी त्याच्या मनाच्या विरोधात असेल किवा तिची आठवण आली असेल त्याला आणि कितीही झाले तरी आपण त्याचे खरे आई-बाबा नाही आहोत." दामोदरपंत.
     " पण आपण त्याला आपल्या पोटाच्या पोरासारखे वाढवले आहे ना ,अम्बाजीपेक्षा जास्त प्रेम केले आपण त्याच्यावर आपल्या पोटाचा पोर नसला म्हणून काय झाले पोटाच्या पोरापेक्षा जास्त प्रेम केले आपण त्याच्यावर मग आपले त्याच्यावर काहीच हक्क नाही ?" आनंदीबाई असे म्हणतात आणि बाहेर खूप वेळ त्या दोघांचे बोलणे ऐकणारा अंबाजी अचानक आतमध्ये येतो.
     " लोक खूप सांगायची हा महादेव तुझा खरा भाऊ नाही आहे , पण मला ते तुमच्या तोंडातून ऐकायचे होते , वा बाबा तो तुमचा खरा मुलगा नसूनही प्रत्तेक गोष्ट पहिली त्याला मिळत असे , प्रत्तेक वेळी त्याचे ऐकून मला तुम्ही शिक्षा करत असत.........." बाहेरून माजघरात येत अंबाजी म्हणतो.
      " पोरा, आम्ही  तुला कधीच अंतर नाही, आणि तो एक अनाथ होता........." आनंदीबाई त्याची समजूत काढत बोलतात
      " जगात महादेव एकटाच अनाथ आहे का? कित्तेक मुल अनाथ असतात साऱ्यांना तुम्ही माझे भाऊ म्हणून आणाल का ?" अंबाजी
      " प्रत्तेक गरीबावर दया करणे हे आपले धर्म आहे पोरा." कधी नव्हे ते दामोदरपंत आज अम्बजीला समजावण्याचा प्रयत्न करतात पण अंबाजी कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो. रोज दामोदार्पन्ताना घाबरणारा अंबाजी आज त्यांच्या समोर उभा राहून त्यांना सवाल जवाब करत होता काय होत आहे हे आनंदीबाई नाही कळत नव्हते.
     " वा बाबा तुम्हाला आतःवते आहे लहानपणी मी एका जखमी मांजराला घरी आणले होते तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात ' जगात प्रत्तेक दुर्बल घटकाचा अंत होणे हा सृष्टीचा नियम आहे. आणि या मांजराच्या पिल्लू हा जखमी आहे म्हणून त्याचा अंत जवळ आहे तू सृष्ठीच्या नियमात ढवळा ढवळ करू नको हे जेथे मिळाले आहे तेथे सोडून ये. हीच गोष्ट महादेवला का लागू झाली नाही बाबा.? "
       " त्या मांजराच्या पोटात खोल जखम झाली होती ते जगणे शक्य नव्हते अंबाजी म्हणून मी म्हणालो." दामोदरपंत त्याला समजावत सांगतात.
       " बाबा , आई तुम्ही त्याला आपला मुलगा मानत असाल पण मी त्याला माझा भाऊ  कधीच मानला नाही आणि मानणार हि नाही .हि काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि हो वेळ पडल्यास मी त्याचा बदला जरूर घेईन."
  अंबाजी असे म्हणतो आणि आनंदीबाई त्याच्या खड्कन कानाखाली मारतात. दामोदरपंत तिथेच सुम्भाने विणलेल्या बादल्यावर बसतात अंबाजी रागाने बाहेर निघून जातो.
क्रमश..............

No comments:

Post a Comment