Friday 30 March 2012

पान नं १३ वरून पुढे...........................

              दामोदर पंत गावात येतात पण रोज गजबजलेले गाव आज सुनसान वाटत होते. जागो- जागी घरे जाळली गेली होती. गावात कुठे कुत्रेही दिसत नव्हते. दिसत होती फक्त प्रेते. माणसांची आणि जनावरांची पण कोणाही ओळखू येत नव्हते. कारण कुणाच्याही धडावर मस्तक शिल्लक नव्हते. असह्य माणसांचे शीर कापून ते नराधम कधीच निघून गेले होते. एका झोपडीतून दामोदर पंताना एका स्त्रीचे रडणे ऐकू येत होते. पण पुढे जाऊन तिची विचार पूस करायची हिम्मत होत नव्हती. दामोदरपंत तडक मंदिरात जातात मंदिर एकदम व्यवस्तीत आहे हे पाहून त्यांना थोडे बरे वाटते ते मंदिराच्या पायऱ्या चढणार इतक्यात त्यांना आपला धर्म भ्रष्ट झाले आहे त्यामुळे देव हि बाटेल हा विचार मनात येतो अगोदर आपण आपली शुद्धी करून घेवू मग मंदिरात जावू असे ठरवतात.दामोदर पंत आपल्या शेतावर असलेल्या महादेव च्या घराकडे निघतात त्यांना माहित असते महादेव आणि सुनबाई नाही आहेत पण घर व्यवस्तीत आहे ना ते पाहू या म्हणून तिकडे निघतात. महादेव चे  घर व्यवस्तीत आहे हे पाहून त्यांचा जीव भांड्यात पडतो.
           दामोदरपंत घराकडे परत फिरतात. गावातील साऱ्या लोकांचे संसार उद्वस्थ झाले होते. जे जंगलात पळाले ते वाचले पण सारे नशीबवान नव्हते अनेक हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले एवढे होऊनही थाबले नाही त्यांना पकडून बंदी बनवून टिपू च्या कुंटणखाण्यात बंदिस्त करण्यात आले यातून नाबालिक मुली सुद्धा सुटल्या नाहीत. गोठ्यात बांधलेली जनावावरांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. गावाचा तो नजरा पाहून दामोदर पंताना काय करावे तेच समाजात नव्हते. पण गावातील ती सारी परस्थिती त्यांनी घरी येवून आनंदी बाईना सांगितली. रात्री कोणीही जेवले नाही  रात्रभर आनंदीबाई गप्प बसल्या होत्या त्यांना महित होते जर आपण रडलो तर दामोदर पंतानाचा आत्मविश्वास डगमगेल रात्री त्यांचा डोळा कधी लागला ते त्यांनाच समजले नाही.
              दुसऱ्या दिवशी आपल्या गावावर आलेल्या संकटाची बातमी महादेव ला समजते तो तडक गावाकडे निघतो. आपल्या परिवाराला कोणतीही इजा होऊ नये म्हणून वाटेत येत असताना तो देवाकडे प्रार्थना करत असतो. वाटेत त्याला गावातला विठ्ठल भेटतो. घडलेली हकीगत सविस्तर सांगतो. दामोदरपंत आणि आनंदीबाई व्यवस्तीत आहेत हे ऐकून त्याला बरे वाटते पण त्यांचा धर्म भ्रष्ट झाला आहे हे ऐकून तो तिथेच मटकन खाली बसतो. थोड्या वेळाने तो परत गावाची वाट पकडतो.
क्रमश ...............

No comments:

Post a Comment