Wednesday 22 February 2012

भाग पहिला -आणि दुर्दैव ओढवले ......

           १८५७ ला म्हैसूरचा नवाब हैदर आली याचा मृत्यू झाला आमी त्याच्या जागी त्याचा शूर पुत्र टिपू आला टिपू गादिवर बसला आणि येथूनच हैद्राबाद सारख्या बहुसंख्य हिंदू असलेल्या संस्थानात हिंदुच्या दुर्दैवाला सुरुवात झाली टिपू गादिवर बसला आणि गादिवर बसल्यावर लगेचच   त्याने स्वत्ताला सुलतान घोषितकेल.. सुलतान बनताच आपले पहिले कर्तव्य म्हणजे जे मुसलमान नाही आहेत त्यांना बाटवून मुसलमान बनवणे जे विरोध करतील त्यांचे शिरकाण करणे त्याच्या बायकांवर ,अल्प वयीन मुलींवर बलात्कार करणे.हे काम टिपू आनंदाने करू लागला .त्यात त्याला राक्षशी आनंद मिळत होता.पण याची झळ मैसूर सारख्या बहुसंख्य हिंदू असणाऱ्या संस्थानाला लागली.४० वर्स्यापुर्वी मैसूरच्या एका छोट्याश्या  गावात दामोदर पंतांचे कुटुंब आले ते कुटुंब हि य आगीमध्ये होरपळले. 
                      दामोदरपंत हे एक कोकणस्थ ब्राह्मण होते. ते निष्णांत वैद्य होते. २५  वर्ष्यापुर्वी   म्हैसूर मधील एका सावकाराने  त्यांची कीर्ती ऐकून आपल्या मुलाच्या उपचारासाठी कोकणातून इथे आणले. मुलगा बरा झाल्यानंतर त्या सावकाराने त्यांना  राहायला घर बांधून दिले. गावातील गणपतीच्या मंदिरात पूजा करण्यासाठी त्यांची नेमणूक केली. इथेच त्यांना अंबाजी नावाचे गोंडस मुल झाले होते. दामोदरपंत यांना गावात खूप मान होता. लोक त्यांना कशाचीही कमी पडू देत नसत पण त्याचा फायदा त्यांनी कधी उचलला नाही. घराची परस्थिती बेताची होती. पिढीजात वैद्यगिरीवर त्यांचे घर चालत असे. पण त्यांनी कधी याकडे व्यवसाय म्हणून पहिले नाही. गावातील कित्तेक गरीब लोकांवर ते विनामुल्य उपचार करत असत. त्यंच्या अश्या धोरणामुळे बायको आनंदीबाई कधी कधी खूप रागावे. पण आपल्या नवऱ्याचे कार्यय किती थोर आहे याची तिला कल्पना होती म्हणून ती लटक्या रागाशिवाय काही करत नसे. 
                   अंबाजी आता वयात आला होता गेल्याच वर्षी त्यांनी त्याचा  लग्न बाजूच्या गावातील लक्ष्मी शि लावला होता. गावात कामधंदा नाही आणि अम्बजीला देवळातील पूजेत स्वारश्य नसल्याने तो पुण्याला एका सावकाराकडे कारकुनाच्या कामासाठी निघून गेला. दुसरा मुलगा महादेव मात्र तिथेच राहत होता. पण गेल्या सहा महिन्यापूर्वीच दामोदर पंतानी त्याला त्याचा कुटुंब घेवून वेगळे राहायला सांगितले होते.
                  महादेव हा त्यांना मुलगा नव्हता. २० वर्ष्यापुर्वी बाजूच्या  गावातील जोश्यांकडे सत्यनारायण सांगायला गेले होते. सत्यनारायणाची पूजा सांगताना बाहेर वरांड्यात एक ५ वर्षाचे मुल तक लाऊन ती पूजा ऐकत होते. एका ५ वर्षाचे मुल तन ,मन , लावून पूजा ऐकतो आहे हे पाहून त्यांना आश्यर्य झाले त्यांनी पूजा संपल्यावर त्या मुलाबद्दल जोश्यांकडे चौकशी केली. " कोणाचे आहे हो ते मुल ?"
         "बाजूला एक विधवा राहते जानकी काही वर्ष्यापुर्वी तिचे पती  निवर्तले. भिक्षा मागून जगते बिचारी तिचे आहे हे मुल मुलगा फार हुशार आहे " जोशी .
       " तो घरात का येत नाही ?"दामोदरपंत.
       " आमच्या श्रीमतीना त्याचा राग येतो, " जोशी.
        " त्या मुलाने काय केल आहे पण " दामोदरपंत .
       " अहो हा जन्मला आणि सहा महिन्यातच याचे वडील वारले आमच्या यांना वाटते कि या मुलगा अपशकुनी आहे याच्यामुळे आपल्या घरातही अपशकून होईल आणि बायाकांपुढे आपले काय चालते आहे होय." जोशी
 सारे कार्यक्रम संपले तसे दामोदरपंत जाऊ लागले. तसा बाजूच्या घरातून तो मुलगा धावत आला. मागोमाग त्याची आई आली. " याने भिक्षुकी शिकावी असे आमच्या यांची खूप इच्छा होती . ते निवर्तले आणि एक स्वप्नच होऊन राहिले आहे  , माझी तेवढी ऐपत नाही तुम्ही शिकवाल?" 
            " का नाही शिकवणार ? मी याला माझ्यासोबत घेवून गेलो तर चालेल तुम्हाला ?" दामोदरपंत .
           " ठीक आहे न्या तुम्ही त्याला ."
           " तुम्हाला केव्हाही भेटायची इच्छा झाली तर या घरी  मी याला भिक्षुकी शिकाविनच पण वैद्य कला हि शिकवीन ."
           " लई उपकार होतील तुमचे " ती हात जोडत म्हणाली.
           " उपकार करणारा मी कोण बाई सर्व ते सर्व वरच्याच्या हातात मी फक्त एक निम्मित आहे. नाव काय बाळा तुझे "
           " महादेव " क्षणाचाही विलंब न करता महादेव म्हणाला.
           " येणार माझ्यासोबत ?" दामोदरपंत.
           " हो " महादेव.
           " चला जानकीबाई मी येतो. तुम्हाला मुलाला भेटायची इच्छा झाली कि या घरी." दामोदरपंत निघून गेले जानकी ते दोघे नजरेआड होईपर्यंत पहात होती. एकुलत्या एक मुलाला दूर जाताना पाहून तिची घालमेल होत होती पण आपल्या पतीच्या इच्छे साठी तिने आपल्या पुत्र प्रेमाला मुरड घातली होती.
क्रमश ...............पुढील भाग उद्या

No comments:

Post a Comment