Friday 24 February 2012

पान न ३ वरून पुढे.........

                दामोदर पंत सारा गाव शोधून काढतात. पण जानकीचा काही पत्ता लागत नाही.ते  तिच्या घरीही शोधतात पण ते तिला शोधण्यास ते अपयशी ठरतात.  शेवटी हताश होऊन ते घरी परततात. घडलेली सारी हकीगत ते आनंदी बाई ना सांगतात. दुसऱ्या दिवशी ते गावातील नदीकाठ पुन्हा पालथा पण तिला शोधण्यास ते अपयशी ठरतात.
              काही महिन्यांनी  दामोदर पंताना पुत्र रत्न होते. मुलाचा नाव अंबाजी ठेवतात. अंबाजी आणि महादेव एका घरात वाढू लागतात.  अम्बजीचे अति लाड झाल्याने तो फार खट्याळ होतो पण त्याउलट महादेव अधिकाअधिक समजूतदार होऊ लागतो. महादेव प्रत्तेक वेळी आपल्या आवडीना मुरड घालून आपल्या हिस्श्यातील प्रत्तेक वस्तू अम्बजीला देत असे. दामोदर पंत आणि आनंदी बाईनी महादेव हा आपला मुलगा नाही हे अम्बजीला कळू नये म्हणून योग्य ती दक्षता घेतात. 
              महादेव आता १२ वर्षाचा झाला होता. आणि अंबाजी ८ वर्षाचा  महादेव आपला जास्तीत जास्त वेळ दामोदर पंताना वन औषधी जंगलातून आणून देण्यासाठी घालवत असे. कोणत्या डोंगरात कोणता औषध मिळेल हे त्याला चांगले माहित होते. आता तो एकटा जंगलात जात असे. जंगलातील आदिवशी पाडे त्याला चांगले ओळखत. सारे आदिवाशी त्याला दामोदर पंतांचा उत्तर अधिकारी म्हणून पहात त्याला मान देत असत.
             दामोदर पंत हे ब्राह्मण असल्याने ते सहसा कोणाच्या घरी काहीही खात नसत ते फट एखाद्या आदीवाशी च्या झोपडीत चहा घेत असत. आपला पाणी मात्र ते नदी किवा ओढ्यातील पीत असत. पण महादेव तसा नव्हता. तो कोणाच्या हि घरी जेवत असे रात्र- रात्र मुक्काम करत असे. पण कुणाकडे फुकटचे खायचे नाही हा त्याचा नियम. कोणते काम नसेल तर त्या आदिवाश्याचे गोठा झाडून द्यायलाही तो कमी करत नसे.
             एकदा एक आदिवशी पसाभर धान्य घेवून दामोदर पंतांच्या घरी आला.
               "राम राम वैद्य बुवा "
                " राम राम , कसा काय आलास धोंड्या " दामोदरपंत.
                " काय सांगू , काळ तीसंच्यानी लय मोती आफत आली व्हती "
                " माझी पोर मंगला तीन धोत्र्याचा बी खाल्ली कि हो " धोंड्या.
                " अरे देवा मग वाचली कि नाही " दामोदर पंत काळजीत म्हणाले.
                " अहो म्हध्या असल्यावर ती मारणार हाय व्हय "
                " पण त्या विषारी फळावर कायच उपाय नाही आहे धोंड्या असा असते तर कित्तेक जनावरांचे प्राण
                 मी वाचवले नसते का जे चुकून धोत्र्यचे बी खातात त्या " दामोदर पंत.
                " मला म्हयीत हाय वैद्य बुवा पण म्हध्यान कसलाश्या पाला आणला तो वाटून तिला पाजला आणि  
                 तीन ४ /५ वांत्या केल्या आणि झाली नव्ह ठणठणीत " धोंड्या
               " अरे पण मला असला कुठलाच पाला माहित नाही मग महादेव ला कसा माहित असेल ." दामोदरपंत
                आचार्याने म्हणाले.
               " आता ते म्हध्यालाच विचारा.आणि हे पसाभर धान्य ठेवा नाही म्हणू नका नाहीतर माझ्यासारख्या
               गरिबाला वायट वाटल " धोंड्या पाठीवरचे बोचके दामोदर पंताना देत म्हणाला.
याला नको म्हणून हा ऐकणार नाही हे दामोदर पंताना चांगले माहित होते म्हणून त्यांनी नकार न देताच ठेवून घेतले.     " धोंड्या महादेव कुठे आहे आता?" दामोदरपंत
               " आज म्या त्याला सकलच धनगराच्या वाड्यात झाड-लोट करताना बगीताला  मी गावात जातो
              हाय येतोस काय विचरला तर बा ला सांगा तीसंचानी येईन घराला म्हणून " धोंड्या. दामोदर पंतानी
              आनंदीला हाक मारून चहा ठेवायला सांगितली .
              " वैद्य बुवा चाय नग  कसला वैनिना तरास देताय" धोंड्या संकोचित होऊन म्हणाला.
            " धोंड्या चहा  तर तुला प्यायलाच लागेल कारण यावेळी मी तुझा ऐकणार नाही "
चहा पान झाल्यावर धोंड्या आपल्या घराचा रस्ता धरतो.
क्रामश ...............
                                                                                                                                            पान नं ०३

1 comment: